समृद्धीसाठी आटापिटा ; शेतकर्यांची रांगोळी आशिया खंडातील सर्वात मोठा ठरणारा नागपूर-मुंबई समृद्धि महामार्गासाठी राज्यशासन अतोनात प्रयत्न करत आहे. परंतु हा आटापिटा कशासाठी आहे , ते जरी स्पष्ट असले तरी शेतकर्यांच्या जमिनी हस्तांतरित करून समृद्धि महामार्ग व (NOD) सिटी आखण्याचा डाव आहे खरा परंतु ज्या शेतकर्याने संपूर्ण आयुष्यभर काबाडकष्ट करून आपल्या जीवाचे रान करून हिरवे फुलवलेले मळे ; व जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी वर्गाकडून सरकार त्यांची जमी न हस्तांतरित करण्याचा सरकारचा डाव म्हणणे चुकीचे ठरणार नाही. शेकडो एकरमध्ये उभारण्यात येणार्या NOD सिटी(कृत्रिम वसाहत) या शहराची अवशकता ही ग्रामीण भागात नाही तर शहरामध्ये आहे. यामुळे अनेक गावांचे उच्चाटन होणार आहे. हे कटू सत्य त्यामुळे शेतकरी वर्गाचा रोष स्वाभाविकच आहे आणि तो असावा परंतु कदाचित सरकार विसरतय. राज्यात असे काही गावे आहे. तेथे अजूनही रस्त्या अभावी विद्यार्थी शाळेत होडीत जातात , पायी जातात अशा रस्त्यांचा , गावांचा विकास सोडून फक्त समृद्ध...